google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

बहिर्जी स्मारक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न .

 

शरीफ आलम

वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात 2 आणि 3 जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि बहिर्जी स्मारक महाविद्यालय,वसमत यांच्या संयुक्त विद्यमानेआंतरराष्ट्रीय चर्चासत्र भारतीय लोकशाही पुढील आव्हाने आणि भारतीय संविधान या विषयावर आयोजित करण्यात आले . ‘भारतीय लोकशाही पुढील आव्हाने आणि भारतीय संविधान’ या विषयावर जागतिक कीर्तीचे अभ्यासक सहभागी झाले होते . भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने भारतीय संविधानाच्या अनेक पैलूंवर अभ्यासकांनी आपले अमूल्य विचार व्यक्त केले. २ जानेवारी रोजी या चर्चासत्राचे उद्घाटन स्वा. रा.ती. म. विद्यापाठ नांदेड कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी केले. तर उद्घाटकीय समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्षस्थानी जयप्रकाश दांडेगांवकर हे होते.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक डॉ श्रीरंजन आवटे (थायलंड, ) यांनी भारतीय लोकशाही समोर जीआव्हाने व्यवस्थेने उभी केलेली आहेत. ती आव्हाने मोडून काढायची असतील तर लोकशाही मूल्यांचा जागर या देशातील बुद्धिवादी, संशोधक, अभ्यासकांनी घातला पाहिजे.असे म्हटले. या प्रसंगी माजी आ. मुंजाजीराव जाधव , माजी.आ. पंडितराव देशमुख , ॲड रामचंद्र बागल प्राचार्य डॉ जाधव , उपप्राचार्य र्डॉ एम. बी. स्वामी आदी मान्यवर विचार पीठावर उपस्थित होते . या प्रसंगी कुलगुरू डॉ मनोहर चासकर , संस्थचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगांवकर , ॲड मुंजाजीराव जाधव , आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ रामभाऊ मुटकुळे आणि डॉ एम. बी. स्वामी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले .यावेळी श्रीरंजन आवटे हे भारतीय लोकशाही पुढील आव्हाने आणि भारतीय संविधान या विषयावर मांडणी करताना ते पुढे म्हणाले की, लोकशाहीच्या सर्व संस्था उध्वस्ती करणाची प्रक्रिया चालू आहे जी संकट हाणून पाडण्यासाठी बुद्धिवाद्यांनी संशोधकांनी जागर करावा . ज्या मूल्यांवर हा देश उभा आहे त्या संविधान मूल्यांचे आपण जोपर्यंत जागरण करीत नाहीत तोपर्यत गणराज्य अस्तित्वात येणार नाही . दुसऱ्या सत्रामध्ये मुंबई विद्यापीठाच्या डॉ वंदना महाजन यांनी ‘ भारतीय स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न’ या विषयावर मांडणी केली . डॉ. दिलीप चव्हाण यांनी ‘ भारतीय शिक्षण आणि लोकशाही मूल्ये’ या विषयावर विचार व्यक्त केले. शिक्षण आयोगाच्या स्वरूपावर ऐतिहासिक भाष्य केले. या आयोगाची भूमिका व त्यांचे स्वरूप भारतीय संविधानातील मूल्यांच्या विरोधी कशी आजपर्यंत राहिली आहेत त्यावर वस्तुनिष्ठ प्रकाश टाकला.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शारदा कदम यांनी केले तर आभार डॉ बी. बी. खंदारे यांनी मानले.
३जानेवारी २०२६रोजी सकाळी अभ्यासक पत्रकार संजय आवटे यांनी’ भारतीय लोकशाही स्थिती’ या विषयावर त्यांनी अंत्यंत प्रखड विचार मांडले. ‘ भारतीय लोकशाहीची स्थिती’ आपल्याला बदलण्यासाठी आपण काय केले पाहिजे या विषयी त्यांनी अतिशय मौलिक विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ कमलाकर चव्हाण यांनी केले . दुसऱ्या सत्रामध्ये इतिहासाचे अभ्यासक डॉ. उमेश बगाडे यांनी ‘ इतिहासाचे ओझे आणि भारतीय लोकशाही’ या विषयावर मांडणी करतांना म्हणाले की,बहुजन समाजातील बहुसंख्यांक लोकांनी वैचारिक स्वातंत्र्य गमावून बसल्यामुळे विषमता नष्ट होत नाही. आदी उदाहरण देऊन मांडणी केली . या आंतरराष्ट्रीय चर्चाचे विविध विद्यापीठाचे २५० प्राध्यापक प्रतिनिधी ,संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभाग नोंदविला होता .अनेक संशोधकांनी आपले शोधनिबंधांचे वाचन केले व त्यावर चर्चा घडवून आणली. या विद्यार्थ्यांनी शोध निबंध चे वाचन केले.या आंतरराष्ट्रीय चर्चाच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ नरसिंग पिंपरणे , डॉ शारदा कदम.प्रा प्रदीप इंगोले, डॉ प्रदीप जाधव, डॉ व्ही टी नरवाडे, डॉ प्रशांत गवळी, डॉ सुभाष क्षीरसागर , डॉ.बी बी खंदारे, डॉ नागनाथ गजमल, डॉ भगवान बोंगाने , डॉ पांडूरंग बर्वे. सुनील नाईक यांच्या सह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक , प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक ,पत्रकार, प्राध्यापक , कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Share
Back to top button