google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

अत्याधुनिक झूम एंडोस्कोपी आता नांदेडच्या गॅलक्सी हॉस्पिटल मध्ये उपलब्ध 

नांदेड (इसाक पठाण)

कॅन्सर रोगाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी अत्याधुनिक झूम एंडोस्कोपी आता नांदेड येथील महाराष्ट्रातील पहिले ‘झूम एंडोस्कोपी हॉस्पिटल’ असलेल्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपल्ब्ध झाली असून यासाठी आता रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे रुग्णांचे पैसे व वेळेची बचत बरोबरच कॅन्सरचे निदान प्राथमिक अवस्थेत होऊन भविष्यात हा आजार आटोक्यात येण्यास हातभार लागणार आहे .

“झूम एंडोस्कोपी” पध्दतीने कॅन्सरचे लवकरच निदान होऊन कॅन्सरच्या पेशी जन्माला येत असतानाच त्याचे योग्य उपचार करून कॅन्सरचे ताबडतोब उच्चाटन करता येते. व या अत्याधुनिक पद्धतीने उपचार केल्यास पचनसंस्थेचा कॅन्सर भविष्यात आटोक्यात येऊ शकतो असे मत नांदेड येथील प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ नितीन जोशी यांनी व्यक्त केले आहे.

कॅन्सर म्हणजे कॅन्सल नसून योग्य वेळी निदान आणि उपचार करून बरा होणारा आजार आहे. गरज आहे वेळेत पोहोचण्याची

नांदेड येथील प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ नितीन जोशी यांच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये मराठवाडा व विदर्भातील पोटविकार तज्ज्ञांसाठी झूम एंडोस्कोपीची प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या वेळी सर्वात जिवघेण्या कॅन्सर रोगाच्या नियंत्रणासाठी चर्चा झाली. यात प्रामुख्याने जपान व आपल्या देशातील कॅन्सर निदान व उपचार पद्धती बदल सखोल अभ्यास केला गेला.

विचार करण्याजोगे म्हणजे

१९४५ साली अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला आणि जपान बेचिराख झाले. त्यानंतर कितीतरी वर्षे हिरोशिमा आणि नागासाकी या भागात गवतसुद्धा उगवले नाही. अणुबॉम्ब हल्ल्यानंतर झालेल्या किरणोत्सर्गामुळे, जपानमध्ये असलेल्या समुद्रातील पाण्यातील खारावलेल्या माशांच्या अत्यंतिक सेवनामुळे जपानमध्ये जगातील सर्वात जास्त जठराचा कॅन्सर पाहायला मिळाला. जपानच्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर अगदी दोनच वर्षांनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. आज तब्बल ८० वर्षा नंतर जपानमध्ये सरासरी आयुष्यमान हे जगात सर्वाधिक पाहायला मिळते. आणि भारताचे सर्वाधिक सरासरी आयुष्यमान हे ७० ते ७२ वर्षे असल्याचे चित्र आहे. या गोष्टींचे कारण म्हणजे जपानमध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय योजना अमलांत आणल्या गेल्या, प्रत्येक स्तरावर. आरोग्य क्षेत्रात आता जठराचा कॅन्सर प्राथमिक (T1) किंवा अतिप्राथमिक (T1a) अवस्थेतच शोधला जातो. त्या देशात कॅन्सर साठी केल्या जाणाऱ्या खूप मोठ्या सर्जरी अभावानेच होतात. याचे मुख्य कारण म्हणजे, जपानने निवडलेली प्रतिबंधात्मक एंडोस्कोपीची पॉलिसी आणि तिथल्या तंत्रज्ञानाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रगती करून या भयंकर आजाराला पूर्णपणे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज रोजी भारतात एखाद्या व्यक्तीला जठराचा कॅन्सर झाला तर, त्याचे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातच होते आणि त्यानंतर सर्व प्रकारचे उपचार करूनही सरासरी आयुष्यमान पाच वर्षांपेक्षा कमी असून एकंदरीत २० ते ३० टक्के रुग्ण वाचण्याची शक्यता असते. एखाद्या देश बेचिराख होतो आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे रात्रीतून उठून पुन्हा आपले अस्तित्व निर्माण करतो आणि त्याच काळात स्वतंत्र झालेला देश इतक्या वर्षांनंतरही अशा प्रकारच्या आजारांना डोक्यात आणू शकत नाही ही शोकांतिका आहे. खरंतर पचनसंस्थेचा कॅन्सर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे अन्न,पाणी, वातावरण आणि दूषित झालेले मन हे आहे.

हे सर्व सांगण्याचा उद्देश जठराचा कॅन्सर आटोक्यात आणण्यासाठी जपानने एंडोस्कोपीची केलेली प्रगती आणि तिथे असलेल्या तंत्रज्ञानाचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सुयोग्य वापर. या एंडोस्कोपी तंत्रज्ञानाचे नाव आहे ‘झूम एंडोस्कोपी’. म्हणजे कॅन्सर होऊ नये हे कोणीही थांबू शकत नाही, तरीही झालेला कॅन्सर प्राथमिक अवस्थेत निदान करून तो त्याच ठिकाणी काढण्यात आला तर त्या रुग्णाला नॉर्मल माणसेइतके आयुष्य मिळते, हे जपानने जगाला दाखवून दिले आहे.

डॉ नितीन जोशी हे नुकतेच जपानला जाऊन “झूम एंडोस्कोपीचे” विशेष ट्रेनिंग घेऊन आले आहेत आणि महाराष्ट्रातील पहिल्या झूम एंडोस्कोपीचे उद्घाटन त्यांचे गुरु आणि भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्तीचे तज्ज्ञ डॉ. मोहन रामचंदानी आणि मित्र डॉ. जहीर नबी ( एआयजी हॉस्पिटल्स, हैदराबाद) यांच्या हस्ते दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी एंडोस्कोपी कार्यशाळेत गॅलक्सी रुग्णालयात करण्यात आले. आणि त्यानंतर मराठवाडा आणि शेजारील विदर्भातील एंडोस्कोपी करणाऱ्या पचनसंस्था विकार तज्ज्ञांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा ३ आणि ४ जानेवारीला आमच्या नांदेड मधील बोरबनस्थित गॅलक्सी रुग्णालयात संपन्न झाली. ‘झूम एंडोस्कोपी’ नेमके काय करते तर, तोंडातून किंवा आतड्यात दुर्बिण घातल्यानंतर आतड्यात असलेल्या पेशींना १२५ पट मोठे करून समोरच्या पडद्यावर पाहते, जेणेकरून कॅन्सरच्या पेशी जन्माला येताना किंवा नुकत्याच जन्माला आल्यावर ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये डिस्प्लेजिया म्हणतात या अवस्थेत निदान करून त्याच ठिकाणी त्याचे समूळ उच्चाटन करता येत. जेणेकरून रुग्णाचे पोट फाडावे लागत नाही किंवा २४ तासांपेक्षा जास्त वेळ दवाखान्यात थांबावे लागत नाही. अशा प्रकारची निदान आणि उपचारासाठी डे केअर सुविधा पुरेशी असते. प्रगत तंत्रज्ञानाच्या योग्य वापर करून आजारातून जलद मुक्ती मिळाल्यास, आयुष्याला मिळालेली गुणवत्ता, प्रवासात होणारा खर्च, दवाखान्यात खूप दिवस थांबून होणारा पैशांचा अपव्यय इत्यादी गोष्टींतून मुक्ती मिळते आणि देशसेवा जास्त चांगल्या रीतीने घडू शकते हा माझा ठाम विश्वास आहे. वय वर्षे ४० नंतर शरीरात कॅन्सर होण्याचा धोका वाढत जातो. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरपेशींमध्ये असणारे डी एन ए रिपेअर मेकॅनिझम ( पेशी अनियंत्रित, अनिर्बंध आणि अनावश्यक वाढू नये म्हणून असणारा वॉचमन) कमकुवत होत जाते. परिणामी वाढत्या वयानुसार हा धोका वाढतो. कॅन्सर म्हणजे कॅन्सल नसून योग्य वेळी निदान आणि उपचार करून बरा होणारा आजार आहे. गरज आहे वेळेत पोहोचण्याची.

झूम एंडोस्कोपी कोणी करावी?

१. वय ४० नंतर पचनाचा त्रास खूप दिवस असेल तर

२. घरात जवळच्या नातेवाईकाना वय ४० च्या आत कॅन्सर झाला असेल तर

३. अचानक भूक, वजन आणि हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर

४. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार… #EarlyCancerDetection #ZoomEndoscopy @GalaxyHospitalNanded

डॉ. नितीन जोशी एमबीबीएस डीएनबी (मेडिसिन) डीएनबी (गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी)

गॅलक्सी पचनसंस्था आणि यकृतविकार रुग्णालय बोरबन, वजीराबाद, नांदेड – महाराष्ट्र

संपर्क: ९९७००३६६६१ / ९७७६५२१६६६१ शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Share
Back to top button